February 15, 2026

धरणातून विसर्ग केल्यावर पुराचे पाणी शिरणाऱ्या ठिकाणी केलेल्या उपाययोजनांची माहिती जाहीर करा – संदीप खर्डेकर.

0
sanvidhan_news_150x150
Spread the love


विषय – धरणातून विसर्ग झाल्यावर नदीपात्रात पूर येणाऱ्या ठिकाणी केलेल्या उपाययोजनांची माहिती जाहीर करावी…
मा. महोदय,
या वर्षी पाऊस 106% पडणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
सालाबादप्रमाणे धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यावर नदीपात्रालगत च्या इमारतींमध्ये किंवा वस्त्यांमध्ये पाणी शिरणार आणि मग “नेमीची येतो मग पावसाळा” ह्या काव्यपंक्ती प्रमाणे मनपा पुरामुळे बाधितांची कोणत्यातरी शाळेत व्यवस्था करणार, त्यांना जेवण, कपडे व इतर गोष्टी उपलब्ध करणार, अनेक स्वयंसेवी संस्था व राजकीय सामाजिक कार्यकर्ते त्यांना माणुसकीच्या नात्याने संसारोपयोगी साहित्याची मदत करणार, पाणी ओसरले की बाधित कुटुंब पुन्हा आपल्या घरी जाणार आणि मग पुढच्या वर्षीचा पाऊस, धरणातून विसर्ग, बाधित कुटुंबियांचे तात्पुरते स्थलांतर हे चक्र सुरूच राहणार.
मी ह्या निवेदनाद्वारे आपणास आग्रही मागणी करत आहे की ” हे दुष्टचक्र थांबविण्यासाठी प्रशासनाने काही कायमस्वरूपी योजना केली असेल तर त्याचा तपशील जाहीर करावा, त्यातील काही अडचणी असतील तर त्या देखील पुणेकरांसमोर खुल्या कराव्यात आणि ज्या 50/100 ठिकाणी धरणातून विसर्ग झाल्यावर पाणी शिरते त्याच्या सद्यस्थितीबाबत अवगत करावे”
आपलाच,
संदीप खर्डेकर.
प्रवक्ता, भाजपा, महाराष्ट्र.
मो – 9850999995

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी