आसाममध्ये रिपब्लिकन पक्षाचे चार उमेदवार निवडणूक रिंगणात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई दि. 02 – आसाम विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने चार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले असून उर्वरित 122 जागांवर भाजप प्रणित एनडीएला रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा दिला असल्याचे अधिकृत घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केली.
गुवाहाटी येथे ईशान्य भारतातील 7 राज्यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख पदाधिका-यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात ना. रामदास आठवले यांनी आसाम विधानसभा निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकासाचा दृष्टीकोन देशभरातील जनतेला आणि आसाममधील जनतेलाही पटलेला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात मुख्यमंत्री हिमंता बिसवा यानी आसामचा सर्वांगीण विकास केला आहे. पायाभूत सुविधा उभारुन आसामचा वेगवान विकास होत आहे. त्यामुळे आसामची जनता भाजप प्रणित एनडीएला बहुमताने विजयी करेल. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकत्यांनीही भाजप उमेदवाराना विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले.
आसाममधील धींग या विधानसभा मतदार संघात रिपब्लिकन पक्षाचे हिरक ज्योती बोरा तसेच किंगसुकीया विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे इजराईल नंदा, मोरीगाव विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे चेनीराम कोनवार, आणि गौरीपुर विधानसभा मतदारसंघात सैदुर रहमान सरकार हे रिपब्लिकन पक्षाचे चारही उमेदवार रिपब्लिकन पक्षाच्या गन्ना किसान या निवडणूक चिन्हांवर निवडणूक लढत आहेत. या चार उमेदवारामधुन जे उमेदवार निवडून येतील ते रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा भाजपप्रणित एनडीएला देतील. रिपब्लिकन पक्षाचे जिंकून येणारे उमेदवार सरकार स्थापन करण्यास भाजपला समर्थन देतील अशी अधिकृत घोषणा ना. रामदास आठवले यांनी यावेळी केली. ना. रामदास आठवले हे आसामच्या 2 दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. आसाम विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणा-या रिपब्लिकन पक्षाच्या चारही उमेदवारांचा ना. रामदास आठवले प्रचार करणार आहेत. तसेच भाजपच्याही उमेदवारांचा ना. रामदास आठवले प्रचार करणार आहेत. आज त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या ईशान्य भारतातील पदाधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीत रिपब्लिकन पक्षाचे ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे, त्रिपरा, मेघालय, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम, मणिपुर या सातही राज्यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. |
हेमत रणपिसे
प्रसिध्दीप्रमुख
